Monday, May 31, 2021

"सेवा परमो धर्मा:....आणि मी"

 " सेवा परमो धर्मा: "....आणि मी


" काय रे काय झाले? एकदम कुठे पळतोय."मी एका पळणाऱ्या मित्राला विचारले.
"टीव्ही बघायला....."तो घाई घाईतच उत्तरला.
"अरे  निख्या, टीव्ही वर बातमी आली आहे की, गुजरात मधे खूप मोठ्ठा भूकंप झाला, आमच्या लातूर सारखा."
"अरे बापरे, हो का? चल मी येतो सोबत" ही बातमी ऐकून मी पण चकित झालो होतो.
                                

    त्या दिवशीची बातमी बघितली आणि एकदम धस्स झालं. ती तारीख होती दिनांक २६ जानेवारी २००१.  भूकंप झाला आणि लगेच तिथे मदत कार्याला सुरूवात देखील झाली.

    संध्याकाळी नेहमी प्रमाणे शाखेत गेलो, तिथे पण याबाबत माहिती समजली. या घटनेनंतर एक दोन दिवसातच शाखेत निरोप आला की आपल्या पुण्यातून मदतकार्य करण्यासाठी जायचे आहे. जे जाऊ शकतात अश्यांनी आपले नाव कळवावे. मी त्या दिवशी खूप विचार केला, आपण जावे का? घरी कसे कळवावे? वगैरे वगैरे.

    आमची पहिली टीम जायची नक्की झाली त्यात मला जाता आले नाही. आपल्या संस्कारात सेवा भाव आहेच पण आज प्रत्यक्ष कृती करण्याची संधी मिळणार होती. ती हुकली असे वाटत असतानाच दुसऱ्या टीम मध्ये माझी पण वर्णी लागली.

    पण एक मोठी अडचण होती ती म्हणजे आमच्या पहिल्या वर्षाच्या तोंडी परीक्षा सुरू झाला होत्या आणि माझे अडनाव इंग्रजी अक्षरा प्रमाणे सगळ्यात उशिरा येणार होते. मग काय करावे काही कळत नव्हते, पण नेहमीचे शस्त्र वापरले " जय गुरु बोल बच्चन"! इंग्रजीच्या मॅडमना ही अडचण पटवली आणि माझी दुसऱ्याच दिवशी तोंडी परीक्षा झाली. ती पण फक्त संघ, त्याचे सेवा कार्य या विषयी आणि ती पण मराठीतच.

                                

    परीक्षा पार पडली, घरून गुजरातला जाण्याची परवानगी मिळाली आणि आमची टीम गुजरातला आली. निसर्गाने दिलेला तडाखा पाहून हतबद्ध झालो होतो. काम प्रचंड होते, त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली. तेथील अनुभव, लोक, त्यांच्या समस्या, जवळून पाहिल्या !!! काही दूर करता आल्या, काही नाही.

    तेथील कार्यात खारीचा वाटा उचलताना खूप जणांशी संवाद होत होता. प्रत्येकाची कहाणी ऐकून मन हेलावून जात होते.

     एक मुलगा होता...सुरेश तो नि त्याचा मित्र शाळेतून परत येत होते....तेव्हा त्याच्या मित्रावर पूर्ण भिंत पडली आणि तो मित्र जागीच गेला. सुरेश वाचला तर खरा, पण तो पूर्ण अनाथ झाला होता. कारण त्याच सकाळी त्याच्या आई वडील, तसेच आई कडील आणि वडिलां कडील सर्व जण त्या भूकंपाने हिरावून घेतले होते.

     दुसरे एक जण होते, त्यांचे ३ मजली घर जमीनदोस्त झाले होते. ते मला म्हणत " निखिल भैया, आपके पुना मै एैसा कोई हॉटेल हैं क्या? जिसका एक दिनका किराया, एक लाख रुपये लगता हैं." चार लाख  खर्च करून बांधलेले आपले घर वास्तूशांती नंतर चौथ्या दिवशीच पडले होते.. त्या घराचा तिसरा मजला जमिनीला टेकला होता. बाकीचे दोन मजले पूर्ण जमिनीने गिळून टाकले होते.

                                

    अशा अनेक घटना आम्हाला अस्वस्थ करत होत्या. आम्ही त्याभागात बरेच काम करू शकलो. मुख्य काम म्हणजे लोकांची भीती कमी करणे! नुसता जोरात सामानाचा ट्रक गेला तरी लोक, लहान मुलं भीतीने टेंट मधून बाहेर येत होते.

    मी आणि माझा मित्र , आम्हा दोघांवर ३०० मुलांची शाखा घेण्याची जबाबदारी होती. आमचा बोलून, ओरडून शेवटच्या दिवशी आवाज देखील फुटत नव्हता. तरीही काम केल्याचे समाधान सर्वात जास्त होते.

    सेवा कार्याचे आठ दिवस कसे आणि कधी संपले काहीच कळले नाही, तिथून निघायचे मन होईना. इतकं प्रेम,आपुलकी जिव्हाळा मिळाला, जाताना त्या लोकांचे आणि आमचे डोळे भरून आले. त्याही अवस्थेत त्या लोकांनी आम्हाला प्रेमाने ताक भरून बाटल्या,विविध खाद्य पदार्थ प्रवासासाठी सोबत शिदोरी दिले. स्वतः घर गमवले,माणसं गमवली तरी देखील प्रवसात आम्हाला काही खाण्याची आबाळ होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. त्यांच्यात ही मानसिक ताकद आली कुठून हा प्रश्न माझ्या मनात आला. म्हणतात न  "देणाऱ्याने देत जावे...देता देता एक दिवस....." हे प्रत्यक्ष त्यावेळी अनुभवातून शिकता आले. किती ही दानत! आपली अवस्था बिकट आहे, तरी देखील आपला हात सढळ असावा!किती मोठी गोष्ट आहे ही!

    हे सेवा कार्य आयुष्यात पहिल्यांदाच झाले,पण खूप संस्कार करून गेले. माझा सेवा व्रताचा पाया भक्कम झाला.आज पर्यंत सुरु आहे.मागच्या लॉकडाऊन च्या काळात असेच प्रत्यक्ष काम करता आले.ते याही वेळी करता येत आहे.

"दादा, तुम्ही एक मदत करू शकता का? माझे पती आणि सासूबाई हॉस्पिटल मध्ये आहेत आणि...." त्या ताई रडतच माझ्याशी बोलत होत्या. " माझा चार वर्षाचा मुलगा पण मी शेजारच्या घरात ठेवला आहे आणि मी पण गृहविलगीकरणात आहे हो..." जरा रडू सावरत त्या बोलत होत्या. रात्री जवळ जवळ बारा वाजता त्यांचा मला फोन आला.
"हो का? काय मदत हवी आहे,ताई?" खरंतर मी पण अगदी नुकताच या महामारीतून बाहेर पडलो होतो. पण कदाचित संस्कार परत सोबत आले.'मैं नही हम' मी त्यांना विचारले.
"प्लाझ्मा हवा आहे, काही मदत होईल का दादा?"
"हो, सकाळी कळवतो,चालेल?"
"हो दादा, सकाळी नक्की कळवा" त्या कळकळीने बोलल्या. 

    त्यारात्री मला काही झोप आली नाही. डोळे मिटले कि त्यांचा तो रडका आवाज...मदतीची हाक. मला काही केल्या चैन पडेना.याच विचारात कधी तरी झोप लागली पण सकाळी बरोबर सात वाजता त्यांचा परत फोन आला. "दादा काही सोय झाली?"

    संघ या सेवाकार्यात मागील वर्षा पासून अनेक कामे करत आहे. त्यातच प्लाझ्मादान प्रबोधन, संकलन, मानसिक आधार, विलगीकरण केंद्र, लसीचे प्रबोधन असे अनेक. त्या ताईसाठी काही फोनाफोनी केली. पण संध्याकाळी त्यांना दुसऱ्या कोणाच्या तरी ओळखीने प्लाझा मिळाला.

    मधे असेच एक दोन दिवस गेले. परत त्या ताईचा फोन आला. 

"दादा हॉस्पिटल मध्ये भरती असलेल्या आमच्या ह्यांना चार दिवस इंजेक्शन नेऊन देऊ शकता का" आर्जवी स्वरात त्या बोलल्या.
"हो देतो कि" मी कोणताच विचार न करता त्यांना कळवले.
चार दिवस त्यांच्या नवऱ्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये महत्वाचे इंजेक्शन नेऊन देता आले.
"Thanks" हा शब्द कानावर पडला...

    खरं तर या आभाराची काही एक गरज नव्हती. ज्या समाजातून आपण येतो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो बसsss. आपण निस्वार्थपणे सेवा केली आणि समोरची व्यक्ती त्या संकटातून बाहेर आली हीच खूप आनंद देणारी बाबा असते. मागच्या वर्षीपासून असे अनेक अनुभव खूप समाधान आणि प्रेरणा देऊन जात आहेत. असेच काम करण्याची प्रेरणा अखंड मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 

    अनेकजण अनेक सेवा कार्य करत आहेत. मी देखील फक्त हे लिखाण करून फक्त हेच सांगू इच्छित आहे कि "सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम  जले, ध्येय महासागर में सरितरुप हम मिले..."

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

"Seva Paramo Dharma: .... and I"


"What happened? Where are you running to?" I asked a guardian friend.
"To watch TV ....." he replied hurriedly.
"Oh Nikhya, there is news on TV that there was a big earthquake in Gujarat, like our Latur."
I was shocked to hear the news, "Oh my God, why? Come with me."

The exam was passed, permission was given to go to Gujarat from home and our team came to Gujarat. I was shocked to see the blow given by nature. The work was huge, so we started work from day one. Look closely at the experiences, the people, their problems !!! Some were removed, some not.

    There was a lot of interaction with Khari while taking part in the work. Everyone's story was moving.

     There was a boy ... Suresh, he and his friend were coming back from school .... Then the whole wall fell on his friend and he went to the place. True if Suresh survived, but he was a complete orphan. Because that morning his mother and father, as well as his mother and father, were all taken away by the earthquake.

     There was another man, whose 3-storey house had been demolished. Te Mala used to say, "Nikhil Bhaiya, is there any such hotel in your Pune? The one day rent is one lakh rupees." Our house, built at a cost of Rs 4 lakh, had collapsed on the fourth day after Vastu Shanti. The third floor of the house was on the ground. The remaining two floors were completely swallowed up by the ground.

Many such incidents were making us uneasy. We were able to do a lot of work in that area. The main task is to reduce people's fears! People, children were coming out of the tent in fear even though the luggage truck went by loudly.

    My friend and I both had the responsibility of taking care of 300 children. On the last day of our talking and shouting, there was no sound. Yet the satisfaction of working was the highest.

    I don't know how and when the eight days of service ended, I didn't want to leave. We got so much love and affection, our eyes filled with tears as we left. At the same time, they lovingly gave us bottles of buttermilk and various food items for our journey. He took care that we would not be bothered to eat anything during the journey even if we lost our house and people. Where did this mental strength come from? This question came to my mind. It is said that one should not give, one day one should give ... What a gift! Even though your condition is critical, your hand should be strong! What a great thing!

    This service work was done for the first time in my life, but went through a lot of rites. The foundation of my service vrata has been strengthened. It has continued till today. I was able to do the same thing during the previous lockdown.

"Dada, can you help me? My husband and mother-in-law are in the hospital and ..." She was crying and talking to me. "My four year old son but I have kept him in the house next door and I am also in house separation yes ..." she was saying with a little tears. I got a call from them at about twelve o'clock at night.
"Yeah why? What help do you need, Tai?" In fact, I had just recovered from the epidemic. But maybe the rites came back together. 'Main nahi hum' I asked them.
"Plasma is needed, will it help, Dada?"
"Yeah, let me know in the morning, okay?"
"Yes Dada, let me know in the morning," she said earnestly.
    
    I didn't get any sleep that night. His eyes met the sound of crying ... a call for help. I didn't feel comfortable doing anything. I fell asleep at the same thought but at 7 o'clock in the morning he got a call back. "Did grandpa make any arrangements?"

    The team has been doing a lot of work in this service since last year. Among them are Plasma Donation Awareness, Collection, Mental Support, Isolation Center, Vaccine Awareness. Made some phone calls for that Tai. But in the evening they found the plaza with someone else's acquaintance.

    A couple of days passed like this. Tai's phone rang again.

"Can you give us four days of injections for Dada Hospital," she said in a pleading tone.
"Yes, I do," I told them without thinking.
For four days her husband was able to take her to a nearby hospital for a critical injection.
The word "Thanks" is heard ...
    In fact, there was no need for this gratitude. We have to give something to the society from which we come. It is a very happy father that you served selflessly and the person in front came out of that crisis. Many such experiences over the past year have been very satisfying and inspiring. Pray at the feet of God to get the motivation to do the same.

    Many are working multiple services. I also just want to say this by writing that "Seva hai yagnakund samidha sam hum jale, dhyay mahasagar mein saritarup hum mile ..."

© Nikhil Devidas Vaze
9011096250

Friday, May 28, 2021

विनायक दामोदर सावरकर/Vinayak Damodar Savarkar

"विनायक दामोदर सावरकर"



     दोन मजली कौलारू वाडा, शेणाने सारवलेले समोरील आणि मागील प्रशस्त अंगण, वाड्यात खाली आणि पहिल्या मजल्यावर खोल्या , वाड्याच्या मध्यात चौक, स्वतंत्र देवघर, मोठे स्वयंपाकघर, मोठी चूल. अशा सधन, सुखी आणि संपन्न वाड्यात, एक पती ( अण्णा) पत्नी( राधाबाई ) आणि त्यांची चार मुले राहत होते.  त्यात तीन मुलं आणि एक मुलगी आणि त्या मुलांचे ज्येष्ठ काका ( बापू) असे समाधानाने राहत होते.

"या या असे वर याss"एक चुणचुणीत मुलगा, काही वाड्यात आलेल्या लोकांना म्हणत होता.
"नको नको जी, आम्ही इथचं थांबतो जीss" जरा दबूनच ते म्हणाले.
"अहो, बाहेर खूप उन्ह आहे!!! आणि तुम्ही दमलेले पण दिसता. वर बैठकीत बसा, मी पाणी देतो" आदराने तो मुलगा बोलला.
"नाई बाsss, तुम्ही कशाला त्रास घेता जी, आम्ही इथचं बरे हवं जीss" जास्तच खजील होत त्यातील एक जण म्हणाला
                            

    त्यावेळच्या जाती व्यवस्थेमध्ये अडकलेल्या समाजातील काही खालच्या समाजातील लोक मालकांना (दामोदरराव) भेटायला आले होते. पण परंपरेत म्हणा किंवा संकोचाने म्हणा, ते अंगणात उन्हातच उभे होते, साधे जमिनीवर देखील बसले नाहीत.

"अहो असे नका करू!!! या तुम्हीss बसाss, तुम्हाला अगदी संकोच वाटत असेल, तर बैठकित न बसता तिथे खाली बसा" ( बैठक वर दगडी ओट्यावर होती.)

    ती आलेली लोकं बैठकी जवळ खाली जमिनीवर बसली. तितक्यात...  बापू काका घरात आले. त्यांना येताना पाहूनच ही मंडळी आदराने जागेवरून उठून उभी राहत म्हणाली...

" राम राम बापू काकाsss" आपण या जागेवर बसलो या भीतीने सगळे कसेबसे घाबरत उभे राहिले होते.

    बापू काका म्हणजे बलदंड शरीर, उंचपुरे, रंगाने गोरे, डोळे जरा घारे असे भारदस्त व्यक्तीमत्व होते. ते घरात येतायेता त्या उभ्या लोकांना पाहत होते. त्यांना ते लोक बैठकी जवळ बसलेले पाहून जरा आश्चर्य वाटले होते. बापू काका त्या लोकांना काही बोलणार तितक्यात...

" बापू काका, आम्ही नाही बसलो बाsss, छोट्या मालकांनी बळेबळे अग्रिव केला मालकss" हात जोडून ते आर्जवी स्वरात म्हणाले.
"कोण? कोणी केला आग्रह?" बापू काकांनी जरा रागानेच विचारेल.
" छोट्या विनायकराव, तात्यांनी केला बाss"
"कोणी तात्यानी!!! मग मी आता काय बोलणार?? बसा बसा बाबा" बापू काका निरुत्तर झाले.

    बापू काका हे विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे काका. अण्णा म्हणजे दामोदर सावरकर यांचे जेष्ठ बंधू पण तरी त्या दोन भावंडांचे जास्त पडत नसे. एकतर त्या दोघात वयाचे अंतर देखील जास्त होते. पण बापू काकांची दामोदर ( अण्णा ) यांच्या सर्व मुलांवर खूप माया होती, सगळ्यात जास्त प्रेम विनायक ( तात्या ) यांच्या वर होते. 

    सावरकर कुटुंब तसे मूळचे कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सावरवाडी येथील होते. पण त्यांचे पूर्वज कधी तरी, कोणी तरी देशावर म्हणजे, कोकण सोडून वरील भागात राहायला आले. असेच दामोदर सावरकर आणि त्यांच्या पत्नी सौ राधाबाई हे देखील नाशिक मधील भगूर या गावी राहत होते. संसार अगदी सुखाचा, समाधानाचा, आर्थिक स्थिरतेचा सुरू होता. मुलं उत्तम गुण संपन्न, शिक्षणात प्रगती करणारी होती.

    ज्येष्ठ पुत्र गणेश( बाबाराव), विनायक ( तात्या), मग एक मुलगी आणि शेवटी नारायण ( बाळ) असे चार गुणवान मुलं त्यांचा संसार फुलवत होती. 

    दिनांक २८ मे १८८३ रोजी विनायक याचा जन्म झाला. उत्तम कुंडली योग होता. असे म्हणतात की एखादा सत्पुरुष व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, त्याच्या जन्मा आधी त्या घराण्याची अनेक वर्षांची देवावर श्रद्धा असते. त्यांच्या अनेक पिढ्या या परोपकार, समाजसेवा, ईश्वरसेवा करत आलेल्या असतात. तेव्हा त्यांच्या घराण्यात असे नररत्न जन्माला येतात. 

    सावरकर घराणं देखील असेच होते, घरात राष्ट्रभक्ती, स्वराज्य याची काळजी घेतली जात होती. ईश्वरसेवा, समाजसेवा केली जात असे. अनेक संस्कृत, मराठी ग्रंथांचे वाचन, चिंतन, मनन घरात होत असे.

    विनायकाचा जन्म झाला, तसे आपल्या घरातील हे संस्कार आपल्या आण्णा, आई, ज्येष्ठ बंधू यांच्या आचरणातून त्यांना दिसत होते आणि ते त्याप्रमाणे आत्मसात करून वागत देखील होते. लहान असताना मित्र देखील मिळाले. सर्व समाजातील मित्रांसोबत नदीत तासनतास पोहावे, तालमीत जावून शरीर बलदंड करावे, शाळेत अभ्यास करावा, वृत्तपत्र वाचन, धार्मिक ग्रंथ वाचन असे सगळे सुरू होते. लहान पणापासून हिंदू धर्मावर अढळ श्रद्धा, पण जातीपाती मध्ये अडकलेला हिंदू समाज त्यांना मान्य नव्हता. हे वरील प्रसंगात समजते. आपण सर्व हिंदू एक आहोत हे बीज लहान असतानाच त्यांच्या मनात पेरले गेले असावे.

    असं म्हणतात पूर्व संचित घेऊनच कधी कधी लोकोत्तर माणसं जन्माला येतात. कदाचित विनायकाबाबत पण असेच घडले असेल. लहान वयातच त्यांना अलौकिक प्रतिभा लाभली होती. आपण चांगले वाचन करावे, जे मिळेल ते वाचावे.एकदा लहान विनायकला आपल्या घरात एक ग्रंथ दिसला. ते काय आहे हे वाचून पाहावे म्हणून त्यांनी त्याचे वाचन सुरु केले. तितक्यात अण्णा त्यांच्याजवळ आले आणि हा पोरगा काय वाचतोय म्हणून पाहतात तर काय?
"अरे तात्या हा ग्रंथ 'आरण्यक' आहे.याचे वाचन घरात करू नये.सर्व घराचे आरण्यक होते असे म्हणतात."
असे म्हणून अण्णांनी तो ग्रंथ छोट्या विनायकाच्या हातातून घेऊन माळ्यावर ठेऊन दिला. 
    आपले अण्णा म्हणतात तसे खरच होते का हे पाहण्यासाठी विनायक त्यांची नजर चुकवून तो ग्रंथ कधी कधी वाचे. लहान वयातच ते काव्य, संस्कृत श्लोक निर्माण करु लागले. कदाचित आईच्या गर्भातच कानावर पडलेले संस्कृत श्लोक, ग्रंथ, स्त्रोत्र याचाच हा परिमाण असेल. 
धन्य कुलामधी धनी सवाई भाग्य धन्यची रायाचे
सेवक हाती यशस्वी असती पुण्यकिती त्या पायांचे||
श्रीमंत प्रभू माधवरायासहित आले दरबारा
जिंही रोविला महाप्रतापे जरी पटक्याला अटकेला||

    आपल्या वयाच्या अकराव्या ( इ.स.१८९४) वर्षी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनावर फटका या बाल प्रतिभा असलेल्या मुलाने भगूर येथे लिहला.

    भगूर मधील मित्रांसोबत प्रार्थमिक शिक्षण पूर्ण करून. आता ते पुढील शिक्षणासाठी नाशिक येथे आले. तिथे तर समविचारी अनेक मित्र भेटले.लहान वयातील विनायकात अनेक गुण होते,त्यातील काव्य रचना तर होताच पण नाशिक मध्ये आल्यावर अजूनही अनेक गुण दिसायला लागले. एकदा नाशिक मध्ये वक्तृत्व स्पर्धा भरली होती, यात छोट्या विनायकाने असे काही भाषण केले की सर्व सभा मंत्रमुग्ध होऊन गेली. भाषणाची सगळ्यात शेवटी संधी मिळून त्यांचा पहिला नंबर आला.

"बाळ तुझे नाव काय? आणि हे भाषण तू कसे केलेस? कोणी लिहून दिले का?" जेष्ठ परीक्षकांनी विचारले.
"नाही, मी विनायक दामोदर सावरकर, हे भाषण मी स्वतः तयार केलेले आहे." त्यांनी ठणकावून उत्तर दिले.

    या  बोलण्यावर त्या आयोजकांचा विश्वास बसला नाही. त्यांना असे वाटले की या मुलाचे हे भाषण दुसऱ्या कोणी लिहून दिले आहे. तेव्हा छोटा विनायक म्हणाला.

" उत्तम वाचन, चिंतन यावर मी भाषण तयार केले. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण भाषण उत्तम करणार या आत्मविश्वासानेच मी सभेतील भाषण केले". असा आत्मविश्वास लहानपणा पासून त्यांच्या अंगी होता..

    छोट्या विनायकाने आता नाशिक मधील काही लोकांच्या मनावर आपल्या संस्कारातून, भाषणातून, नेतृत्व गुणामुळे भुरळ पाडली होती.

" अरे, तुझे नाव ' सावरकर ' म्हणजे, ज्याचे 'कर' राष्ट्राला सावरतात तो सावरकर" नाशिक मधील एक लोकमान्यांचे कट्टर समर्थक होते. ते नेहमी छोट्या विनायकाला असे म्हणतं. कदाचित लहान विनायकाला त्यांनी ओळखले असावे. नाशिक मधील शिक्षण, मित्रांसोबत मित्रमेळे,  वाचन असे सगळे सुरू होते.. आणि काही महिन्यातच प्लेग या महामारीने आधी पुण्यात, मग मुंबई आणि मग नाशिक... असा प्रवास करत, हा महाभयंकर संसर्ग रोग नाशिक मध्ये आला. त्यामुळे विनायकाला परत आपल्या घरी भगूर येथे जावे लागले. 

    घरी गेले तरी त्यांचे वडील श्री दामोदर सावरकर आणि मोठे भाऊ बाबाराव हे गावातील काही जणांची सेवा करत असलेले त्यांनी पहिले. त्यांच्याच एका मित्राच्या वडिलांची सेवा अण्णा करत होते. पुण्यातील संसर्ग कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक विशेष अधिकारी नेमला. त्याचे नाव  डब्ल्यू. सी. रँड. हा रँड लोकांची, स्त्रियांची, घरांची अमानुषपणे झाडाझडती घेवू लागला. घरातील देवालय, सामान, सगळे उध्वस्त करू लागला. या महामारीत अनेक लोकांचे प्राण देखिल गेले तरी त्याचे अत्याचार असेच सुरू होते.  

    दिनांक २२ जून १८९७ रोजी श्री दामोदर चापेकर  त्यांचे श्री बाळकृष्ण चापेकर  आणि श्री महादेव रानडे यांनी अमानुष रँड आणि ब्रिटिश सरकारच्या त्रासला कंटाळून त्याला कडक शासन व्हावे यासाठी त्याचा वध केला."गोंद्या आला रेss..." 

    पुण्यात ही घटना घडली पण त्याचे पडसाद सर्व दूर पसरले. छोटा विनायक लहान पणापासून आपल्या घरात नियमित वृत्तपत्र वाचन करत होताच. त्याला मी बातमी समजली. काही महिन्यातच चापेकर बंधू यांना अटक झाली ( द्रविड बंधू फितूर झाले).चापेकर बंधू यांना ब्रिटिश सरकारने सन १८९८ आणि १८९९ मध्ये फाशी दिली.

     या फाशीची बातमी वाचून विनायक अत्यंत अस्वस्थ झाला. संध्याकाळ झाली...तो घरात चलबिचल करत फिरत होता... मनाची प्रचंड घालमेल सुरू होती.. तो संपूर्ण वाड्यात फेऱ्या मारत होता..त्याचे हे असे वागणे अण्णांनी पाहिले. आपला मुलगा प्रचंड अस्वस्थ आहे. त्यांना हे लक्षात आले की या विनायकाच्या मनात काही तरी घालमेल सुरू आहे. वडिलांनी आपल्या मुलाचे मन ओळखले. 

" तात्या...अरे तात्या... नकोsss नको त्या वाटेने जाणे. ती वाट म्हणजे....नको रे नको" अण्णांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. विनायक काही बोलला नाही. तो सरळ आपल्या देवघरात गेला. त्याच्या पंजोबांनी ( आजीचे वडील) यांनी पराक्रम करून मिळवलेल्या देवीच्या मूर्तीच्या पायांना हात लावला आणि प्रतिज्ञा घेतली.




" हे मातृभूमि, तुझे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारेन, त्यासाठी या जुलमी ब्रिटिश सरकारशी मारीता मारीता मरेतो झुंजेन..आई तुला स्वतंत्र नक्की करेन" वयाच्या अवघ्या चौदा- पंधरा वर्षांचा विनायकाने जन्मभराची देशसेवेची प्रतिज्ञा घेतली.                                            

    पुढील शिक्षण नाशिक... मग पुण्यात शिक्षण... मग लंडन मधील शिक्षण. हे सगळे सुरू असताना कधीही आपल्या ध्येयापासून त्यांचे लक्ष विचलित झाले नाही. सशस्त्र क्रांती करत राहिले. मागे या विषयी बोललो आहेच. ( https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/100-years-of-freedom.html) असे हे श्री विनायक दामोदर सावरकर यांचे बालपण होते. 

आज क्रांतिवीर श्री विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निम्मित त्यांना विनम्र अभिवादन.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

                                                    "Vinayak Damodar Savarkar"

    Two storey Kaularu castle, spacious front and rear courtyard covered with dung, rooms downstairs and on the first floor of the castle, square in the middle of the castle, separate temple, large kitchen, large chool. In such a rich, happy and prosperous castle, lived a husband (Anna), wife (Radhabai) and their four children. There were three sons and a daughter and the eldest uncle (Bapu) of those children was living happily.

"Come on, come on," said a little boy, to some people in the castle.
"No, no, we'll stop here," he said with a sigh.
"Hey, it's too hot outside !!! And you look tired. Sit up in the living room, I'll give you water" said the boy respectfully.
"Nai bass, why are you bothering us, we want to get better here"

People from some of the lower castes who were stuck in the caste system of that time had come to meet the owners (Damodarrao). But traditionally or hesitantly, they stood in the sun in the courtyard, not even sitting on the plain ground.

"Hey, don't do that !!! You sit here, if you feel hesitant, sit down without sitting" (There was a stone oatmeal on the seat.)

    She sat down on the ground near the meeting place. Just then ... Bapu Kaka came home. Seeing them coming, the congregation stood up respectfully and said ...

"Ram Ram Bapu kakass" Everyone was standing in awe of the fear that we were sitting on this place.

    Bapu Kaka was a strong personality with a strong body, tall, fair complexion and dark eyes. He was looking at the people standing in the house. He was surprised to see them sitting near the meeting. As soon as Bapu Kaka will say something to those people ...

"Uncle Bapu, we didn't sit down. The small owners pushed hard," said the owner, clasping his hands.

"Who? Who insisted?" Uncle Bapu will ask angrily.

"Little Vinayakrao, Tatya did it"

"Someone Tatyani !!! So what am I going to say now ?? Sit down Baba" Bapu uncle became speechless.

    Bapu Kaka is the great uncle of Vinayak Damodar Savarkar. Anna is Damodar Savarkar's elder brother but he did not care much for those two siblings. Either way the age gap between the two was even greater. But Bapu's uncle had a lot of love for all the children of Damodar (Anna), most of all for Vinayak (Tatya).

    The Savarkar family was originally from Savarwadi in Guhagar taluka of Ratnagiri district in Konkan. But sometime, their ancestors left the Konkan and settled in the upper part of the country. Similarly, Damodar Savarkar and his wife Mrs. Radhabai were also living in Bhagur village in Nashik. The world was just beginning with happiness, contentment, financial stability. The children had excellent marks and progress in education.

    His eldest son Ganesh (Babarao), Vinayak (Tatya), then a daughter and finally Narayan (baby) were the four virtuous children who were making their world flourish.

On 22nd June 1897, Shri Damodar Chapekar, his Shri Balkrishna Chapekar and Shri Mahadev Ranade, tired of the inhuman rand and the harassment of the British government, killed him so that he could be severely punished.

    The incident took place in Pune but its repercussions spread far and wide. Chhota Vinayak has been reading a regular newspaper in his house since childhood. I understood the news to him. Within a few months, the Chapekar brothers were arrested (Dravid brothers became insane). The Chapekar brothers were hanged by the British government in 1898 and 1899.

     Vinayak became very upset after reading the news of this execution. It was evening ... he was wandering around the house ... his mind was getting very busy .. he was going round the whole castle .. Anna saw him behaving like this. Your son is hugely upset. He realized that something was wrong with Vinayaka's mind. The father recognized his son's mind.

"Tatya ... Oh Tatya ... I don't want to go that way. That way is ... I don't want to go" Anna tried to explain to him. Vinayak did not say anything. He went straight to his temple. His Panjoba (grandmother's father) touched the feet of the idol of the goddess, which he had obtained by might, and took a vow

"Motherland, I will raise the bar of armed revolution to get your freedom, for which I will fight with this tyrannical British government..I will definitely make you independent" Vinayaka, who is only fourteen or fifteen years old, took a vow of lifelong service to the country.

    Further education in Nashik ... then education in Pune ... then education in London. While all this was going on, their attention was never distracted from their goal. The armed revolution continued. We have already talked about this. https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/100-years-of-freedom.html This is Vinayak Damodar Savarkar.

Today, on the occasion of the birth anniversary of Krantiveer Shri Vinayak Damodar Savarkar, polite greetings to him.

© Nikhil Devidas Vaze
9011096250

Thursday, May 27, 2021

"श्री गुरुदेव दत्त"

 "श्री गुरुदेव दत्त" 

                                                


       खरंतर हा विषय लिहावा का? असा प्रश्न मला पडला होता. पण कदाचित महाराजांची  अशीच प्रेरणा असेल म्हणून हे लिहण्याचे धाडस करत आहे. 

    ज्याच्या त्याच्या धारणा, श्रद्धा योग्यच असतात, त्याबाबत मला प्रचंड आदर आहेच. प्रत्येकाची श्रद्धास्थाने ही वेगवेगळी असतात, त्यामुळे कुणाच्याही श्रद्धा नि समजुतींना धक्का न लावता, मला "श्री गुरुदेव दत्त" या विषयावर नक्कीच काही तरी चांगले लिहता येईल अशी माझी मनोदेवता मला सांगत असल्याने माझ्या अल्प मतीने हा एक प्रयत्न करत आहे. लहानपणापासून आमच्या घरात गुरु परंपरा आली आहे. ती आज पर्यंत तशीच टिकून आहे.

प.पू.श्री विष्णु महाराज पारनेरकर

       " काय रे? उपासना तुम्हाला हवी आहे की, तुमच्या बाबांना ? तुम्ही नियमित करणार ना उपासना? म्हणजे तुमच्या बाबांची इच्छा आहे म्हणून उपासना नाही ना घेत?  असे प्रश्न विचारून १४-१५ वर्षे वयाच्या आम्हाला प.पू.श्री विष्णु महाराज पारनेरकर यांनी उपासना दिली. जी कधीही खंड न पडता सुरू आहे. याचे फळ, बळ, सामर्थ्य किती आहे हे मागील अनेक प्रसंगातून जाताना जाणवले. ज्या ज्या अडचणी, संकटे, आली त्यांना तोंड देण्यासाठी मनाचा संयम आणि शांतता ठेऊन मार्ग काढता आला हे माझ्या उपासनेचे सार मी मानतो .

    पुण्यात आलो तेव्हा पहिल्यांदा कमला नेहरू पार्क जवळील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलो. सुंदर रेखीव मंदिर!  गाभाऱ्यात लहानशी दत्त मूर्ती आहे. या मूर्तीचे रूप खूप लोभस आहे...रेखीव लहान मूर्ती, प्रसन्न आणि सात्विक भाव, गाभाऱ्यातील शांतता, गळ्यात नाजूक,सुबक, बटबटीत नसलेले सोन्याचे दागिने आणि गळ्यातील निशिगंधाचा हार या सगळ्यामुळे मूर्तीला शोभा तर आलीच होती पण त्यातील देवत्व माझ्या मनाला व्यापत होते. मूर्ती समोर छोट्या पादुका आहेत, त्यावर कायम अष्टगंध लावलेलं असतं. त्याचा सुवास अजून ही माझ्या मनात दरवळतो आहे...

    

    आज दत्त महाराजांच्या कृपेने गिरनारला जाता येते......तेव्हा पहिल्या पायरीची अशीच अष्टगंधाने पूजा केली की तो सुवास मनाला प्रचंड शांत करतो. या दत्त मंदिरात अखंड नामस्मरण सुरू असते. मंदिरातील पूर्वीचे बांधकाम आता बरेच बदलले आहे. काळानुरुप त्यात अनेक बदल झाले.पण दत्त मूर्ती, त्यांचे अलंकार, अष्टगंध आणि सुंदर निशिगंधाचा हार अजून मी पहिल्यांदा पाहिले तसेच आहे. विद्यार्थी दशेत हे मंदिर माझ्यासाठी विसाव्याचे ठिकाणं होते.

    नंतर जेव्हा श्री गुरुचरित्र वाचायला लागलो तेव्हा दत्त संप्रदाय, दत्त सेवाभाव, त्याचे काय महत्व आहे हे अजून जाणवायला लागले. आज ही दत्त महाराजांच्या बद्दल अभ्यास, वाचन, मनन सुरू आहेच. पण त्यांच्या बाबतीत आदर, श्रद्धा, भावनिक गुंतवणूक ही खूप जास्त आहे.

                                        

    माझी हीच धारणा आहे की "करणारे ते, आपण फक्त निमित्त" आणि हाच विचार अनेक वर्षांपासून मनात रुजल्यामुळे...चांगले होवो, वाईट होवो तरी त्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्णतः बदलून गेलेली आहे.श्री गुरू महाराजांची भक्ती, श्री गुरूचरित्राचे पारायण, गिरिनारची वारी यावर अजून खूप बोलता येईल पण मला माझी मर्यादा माहीत आहे...त्यामुळे आता थांबतो. कारण याची फक्त अनुभूतीच घ्यावी लागते. पहिल्या पावसातील मातीचा सुगंध हा शब्दात सांगणे कठीण आहे तसेच काहीसे माझे श्री दत्त महाराजांबाबत होते.  

"श्री गुरुदेव दत्त"

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या (comment) प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या, सोबत आपले नावंं लिहावेे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

"Sri Gurudev Dutt"

    Should this topic really be written? I had such a question. But perhaps Maharaj has the same inspiration so he is daring to write this.

    I have a lot of respect for those whose beliefs are right. Everyone's beliefs are different, so without disturbing anyone's beliefs, my mentality is telling me that I can definitely write something better on the subject of "Shri Gurudev Dutt", so I am making this one with my little opinion. Guru tradition has been in our house since childhood. It has survived to this day.

 Shri Vishnu Maharaj Parnerkar gave us worship at the age of 14-15 by asking such questions: The essence of my worship is that I have been able to find a way out of many difficulties and calamities with restraint and peace of mind.

    When we came to Pune, we first visited the Datta Temple near Kamala Nehru Park. Beautiful Rekhiv Temple! There is a small idol of Datta in the temple. The form of this idol is very greedy ... linear small idol, happy and sattvic mood, serenity in the womb, delicate, beautiful, unadulterated gold ornaments around the neck and the necklace of tuberose around the neck made the idol beautiful but the divinity in it occupied my mind. There are small shoes in front of the idol, which is always covered with Ashtagandha. Its fragrance is still lingering in my mind ...

Today, by the grace of Datta Maharaj, one can go to Girnar ...... then the first step is worshiped with the same Ashtagandha that the fragrance calms the mind immensely. In this Datta temple, continuous remembrance of the name begins. The earlier construction of the temple has now changed a lot. There have been many changes in it over time. As a student, this temple was a resting place for me.

    Later, when I started reading Shri Gurucharitra, I started to realize the importance of Datta Sampradaya, Datta Sevabhav. Today we are studying, reading and meditating about Datta Maharaj. But in their case, respect, faith, emotional investment is too much.

My belief is that "those who do it, you are just an excuse" and this idea has been ingrained in my mind for many years ... for better or for worse, the way of looking at it has completely changed. Talk about rubbing salt in my wounds - d'oh! Because you just have to experience it. It is difficult to put into words the fragrance of the soil in the first rain and something like that happened to me about Shri Dutt Maharaj.

"Shri Gurudev Dutt"

© Nikhil Devidas Vaze
9011096250

Monday, May 24, 2021

"बुक शेल्फ, मुक्त लेख कार्यक्रम"

"बुक शेल्फ, मुक्त लेख कार्यक्रम" 


मस्कार,

    बुक शेल्फ, पुस्तक विक्री आणि प्रकाशनने काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या मुक्त लेख कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थीचे लेख खाली देत आहे. आम्ही ही कोणतीच स्पर्धा घेतली नाही म्हणून याला आम्ही फक्त कार्यक्रम असे संबोधले. सहभागी सर्वांचे लेख/कथा/ अनुभव खाली देत आहे.

    कृपया सर्वांनी खालील त्यांचे मुक्त लेख वाचून अवश्य प्रतिक्रिया कळवाव्यात. जेणे करून त्यांना प्रोत्साहन मिळेलं.

धन्यवाद,

बुक शेल्फ, निखील देविदास वझे
९०११०९६२५०

१) मी बडबडी 

    तुम्हाला माहिती आहे का की माझ्या घरातले सगळे मला बडबडी म्हणतात.  मला सांगा बडबड करणं काय वाईट असतं का? त्याशिवाय आपण एकमेकांशी संवाद कसा साधणार? आता साधं उदाहरण घ्या ... आई ऑफिसला जायच्या गडबडीत असते तेंव्हा मी नेमकी उठलेली असते. मग मी आई पाशी जाते आणि तिला विचारते. 

"आई तू पोळ्या कशा गं लाटतेस? किती गोल गोल होतात तुझ्या पोळ्या.  मला शिकव ना, मला दे ना करायला." तर आई म्हणते "मनू जा बरं बाहेर जाऊन खेळ. मला नको त्रास देऊ आत्ता." 

मग मी जाते आजीकडे, "आजी आजी तू काय करत आहेस? जरा माझ्याशी खेळ की." तर आज्जी म्हणते "अनिशा मी आत्ता चहा पिते आहे की नाही. नंतर खेळूया आपण." 

मग मी आपली जाते बाबाकडे, "बाबा चल, आपण सायकलिंग करूया.  तू तरी खेळ की माझ्याशी." तर बाबा म्हणतो, "अगं बंतुल्या मला आत्ता ऑफिसचं काम करायचं आहे.  उद्या खेळू हं आपण." 

    सगळेजण आपले बिझी आहेत आणि कुणीच कुणाशी बोलत नाही. मीच बोलले नाही तर मग काय होणार? तरीही मला आपले सगळे जण बडबडी म्हणतात. आता सांगा काय करायचं मी तरी? 

© अनिशा अभ्यंकर, 
मोबाईल ९८३४६६११३१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२) विद्वत्तेची पूजा


    कुंथलगिरी नावाचं एक राज्य . ह्या  राज्याचा व्याप राजाने प्रजेच्या सहाय्याने मोठा केला होता. राजाचं नाव होतं युगंधर. हा राजा मोठा प्रजाहितदक्ष राजा होता. पण राजाच्या एका दुर्गुणामुळे  त्याच्या सद्गुणांवर चादर ओढावून घ्यायला सुरुवात झाली होती. हा होता राजाचा स्वतःचाच  मोठा शत्रू 'अहंकार' याची चादर  काढणं हे प्रधानजींनाच  करावं लागणार होतं. प्रधानजी सतत वेगवेगळ्या युक्त्या काढून राजाचा हा अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करत असत.

    तशातच गावात एक शारंगधर नावाचा विद्वान ब्राह्मण येऊन राहिला होता. आपल्या विद्वत्तेमुळे त्याचा विविध प्रकारे लौकिक वाढतच  जात होता. याच संधीचा प्रधानजींनी  फायदा घ्यायचे ठरवले. त्यांनी जाऊन मुद्दामच राजाच्या मनात शारंगधराबद्दल काहीबाही  भरविले. त्यामुळे राजाच्या मनात त्याच्याबद्दल राग उत्पन्न झाला आणि त्याने शारंगधराला उलट सुलट प्रश्‍न विचारुन त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.

    ठरल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी शारंगधर दरबारात हजर झाला राजाने त्याला काही प्रश्न विचारले त्याने त्याची अगदी चोख आणि उत्तम स्‍पष्‍टीकरणासहित उत्तरे दिली .राजा त्याच्या  हजरजबाबीपणावर  फार खुश झाला पण शेवटच्या उत्तराने मात्र राजाचा अहंकार नष्ट झाला राजाने असा प्रश्न केला की, "मनुष्याचे स्वतःचे असे शत्रू कोण"? त्यावर शारंगधर उत्तरला, "हे नृपश्रेष्ठा, अहंकार आणि कुविचार!!! आपल्या मनाने जर वाईट विचार केले तर मनुष्य आत्मविश्वास हरवून बसतो... जे वैरी न चिंती ते मन चिंती. याच प्रमाणे अहंकाराचे देखील आहे. मीच श्रेष्ठ या मनातील भावनेमुळे मनुष्याने रचलेली गुणांची, यशाची इमारत अहंकाराच्या एका जड विटेमुळे ढासळून जाते आणि ती ढासळली की उभारणं फार कठीण जातं." 

    राजाला वाटलं हे आपल्या बाबतीतच नाही का? मीच श्रेष्ठ राजा या मनातील अहंकारी भावनेमुळे आपण या महापुरुषाची परीक्षा घेतली, आपल्याला ह्याचा राग आला राजाने त्याचे पाय धरले आणि सारी कबुली दिली आणि शेवटी उद्गारला 

 विद्वत्वं च नृपत्वं च नैव तूल्यं कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूजयते ।   

© कु . आर्या विवेक पर्वतीकर.
+91 84595 95321

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३) माझे घर प्रसन्न... 

    ला अजूनही आठवतं , अगदी स्वच्छ आठवतं. बाकी लहानपणीचं काही आठवत नाही पण ते घर मात्र मनात घर करून राहिलं आहे. गदिमांच्या कवितेतील 'खेड्यामधले घर कौलारू...' असं ते घर होतं. 

     कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील छोटसं गाव 'तुळशी'. निसर्गसंपन्न , कृषीसंपन्न , टुमदार गाव... तिथे आमचं घर आहे. काळानुरूप त्या घरात अनेक बदल केले आहेत खरे, पण जुन्या घराची आठवण ती काही वेगळीच.... आजही त्या आठवणी माझ्यासोबत आहेत.

     घरासमोर मोठं अंगण होतं. आवारातील आंबा , फणस या झाडांची सावली अंगणात पडायची. वाऱ्यावर ताल धरून ती झाडे अंगणात छायानृत्य करायची. आठवड्यातून एकदा अंगण गायीच्या शेणानं सारवलं जाई. शेणाच्या सुगंधात ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून मी मोठे झोके घ्यायचे. मला येत असणारी सगळी गाणी , कविता , बडबडगीते म्हणायचे. घरातील जमिनी , भिंती मातीच्या होत्या. त्यावरही शेणाने सारवले जाई. दिवसभर ती जमीन सुंदर दिसे. सारवलेल्या अंगणात  तुळशी वृंदावन आणि काढलेली रांगोळी सुरेखच दिसे. उन्हाळ्यात कैऱ्या अंगणात पडायच्या. पावसाळ्यात त्या अंगणात सगळा चिखल व्हायचा. हिवाळ्यातील पौर्णिमेला अंगणात सुंदर प्रकाश पडलेला असे.

    दुपारी जेवायला गुरगुटा भात त्यावर तूप - मीठ , मेतकूट किंवा भाजी - भाकरी , पोळी - भाजी असा साधाच पण अत्यंत रूचकर आहार असायचा. ओल्या खोबऱ्याने आणि चुलीच्या वासामुळे कोणताही पदार्थ 'राजमान्यच' व्हायचा. केळीच्या लांब पानावरच जेवणं व्हायची. जेवणानंतर पुन्हा शेणाचं पाणी टाकून जमीन सारवली जायची. 

    मग दुपारभर पडवीतल्या झोपाळ्यावर आडवं पडून पुस्तक वाचणं , वाचता वाचता  तिथेच झोपणं.... आहा.... काय दिवस असायचा.... संधीप्रकाश डोळ्यावर आल्यावर उठायचं. छान वारा सुटलेला असायचा. आमचा गडी चरून आलेल्या गायींची धार काढत असायचा. गाय वासराला चाटायची. गाय आणि वासराचा मौन संवाद चाललेला असे. त्या वातावरणातच आम्ही खेळायला , फिरायला बाहेर पडायचो.  परतताना गणपतीच्या देवळात जायचो. घरात जाण्याआधी गायीला चारा घालून यायचो. मग परवचा म्हणून , जेवून झोपायचो.

    स्वच्छ ,शुध्द हवा, आनंदी जीवन असं आयुष्य होतं.कसला ताण - तणाव नसायचा. सुख म्हणजे नक्की काय?  या प्रश्नाचं उत्तर म्हणजे... ते खेड्यातील जीवन होतं. सुखसोयी कमी होत्या हे खरं असलं तरी आनंद मिळवायला सुखसोयी लागत नाहीत.

     कालांतराने आम्ही पुण्याला आलो. येथे सुखसोयीयुक्त मोठं घर घेतलं पण ते घर नेहमीच माझ्या मनात राहिलं. आजही त्या आठवणी जाग्या होतात , ते घर , ते जीवन स्वप्नात येतं आणि मन हुरहुरतं. कधी कधी हे जादूई महानगर सोडून तिकडे जाऊन सुखात रहावं असं वाटतं. गावात राहून दोन वेळा खाल्लेला मऊभात , आनंद आणि तणावमुक्त आयुष्य आपल्याला दीर्घायुषी बनवेल.

    असं आमचं प्रसन्न घर कायमसाठी माझ्या मनात राहिलं.... शेवटी मी एवढंच म्हणेन की 

 "राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ,               

 ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या...."

©वेदश्री विनायक देशमुख.
+91 97302 53960

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Thursday, May 20, 2021

"पांडोबा"

 "पांडोबा"

    "भामा अगं ए भामा"  पांडोबा घाई घाई ने आवाज देतच घराच्या दारापर्यंत आला. घर दिसायला जरी झोपडी सारखे असेल तरी त्या दोघांनी आपल्या हातांनी ते नेटाने उभं केलं होतं.

                            
     भामा आणि पांडोबा यांनी चार भांडी घेऊन आपला संसार सुरू केला आणि याच जागी दोघांनी आपला घाम गाळून हे घर उभं केले. पांडोबाने रानावनात हिंडून आपल्या डोक्यावरून वाळक्या कारवीच्या मोठंमोठाल्या मोळ्या बांधून  आणल्या.  एक एक कारवीची काठी उभं करत चार भिंती उभ्या केल्या... दोघांनी पण रात्रंदिवस मेहनत करून ते घर उभं केलं. हातावर दोरी वळून वळून त्या सगळ्या उभ्या काठ्या बांधल्या आणि त्यावर  काळ्या मातीचा चिखल करून करून थापला. चार भिंती तर उभ्या राहिल्या पण छतासाठी परत रानावनात हिंडून गवत, सागाची वाळलेली पानं गोळा करून त्यापासून भामान छप्पर विणले. 

"आता हे छप्परss टाकलं की आपलं घरं तयार होतंय!!!.."असे म्हणतं दोघांनी पण अजून मेहनत केली आणि त्याच जिझ झालं. त्यांच हक्काचं घर उभं राहिले.

    तसा हा आता इतिहास झाला. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी हे घर उभे केलेलं होतं. वारंवार त्याला वाऱ्या, पावसात नुकसान होत होतं आणि ते त्याला अशीच मेहनत करून परत उभं करत होते.

     आज असाच तो घराच्या जवळ येतच भामाला हळी घालत होता.

"का ओss काम्हून बोलवता?" भामाने घरा बाहेर येत विचारले.
" अगं म्या इनामदारच्या वाड्यावर(https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/Inamdarwada.html) जाऊन येतो आणि वाईज पानी दे प्यायला"
" हा अंती" भामा घरातून  मातीच्या मडक्यात पाणी घेऊन आली.
    
    पांडोबा उघड्या अंगावरचा घाम पुशित बसला होता. कंबरेवर गुडघ्यापर्यंत येईल असा पंचा बांधला होता. खांद्यावर फक्त एक तसाच पंचा. बाकी वरच शरीर उघडं, रंगाने एकदम राकट तांबुस, उघड्यावर त्याचे पूर्ण शरीर तापून निघालेले दिसतं होते. भामाने पण आपल्या अंगावर दहा ठिकाणी ठिगळं असलेलं लुगडं नेसलेले होते. तिचे ते लुगडं पण फक्त जेमतेम तिच्या घुडघ्यापर्यंत येत होते. असा त्यांचा फाटका संसार सुरू होता. भामाने आणलेलं पाणी तो तोंड लावून गटागटा प्यायला आणि पाणी पिवून तो टाकोटाक वाड्याच्या दिशेला निघाला.                              


 "रामss रामss मालक" वाड्याचा लाकडी उंबरठा ओलांडतच त्यानं साद घातला.
"अरे, आला का पांडोबा!!! ये बसं बस असा.." इनामदार नानांनी त्याला बसायला सांगितले.

    पण आपण हरकाम्या, या भावनेने तो त्यांनी दिलेल्या जागेवर न बसता, आहे त्याच जागी गुडघ्यात वाकून ( शौचाला बसतो तसे ) बसला. 

" मालक कहाला बोलविलत जीss?" 
" अरे जरा आमच्या हिच्या सोबत जिल्ह्याला जातोस का उद्या सकाळी? मला जायला जमणार नाही, सोबत म्हणून जा आणि काय सामान असेल ते ओझ घेऊन ये, काही खरेदी करायचे आहे तीस" नाना सुपारी अडकित्त्यात फोडत पांडोबाला बोलत होते.
" जातो की, बाईंना सांगा मी हाय त्यांच्या संग. बरं अजून काय हुकुम"
"नाही, मग ये उद्या सकाळी"
"होय जी" 

    पांडोबा मेहनती, प्रामाणिक होताच आणि त्यावर विश्वास देखील ठेवण्यासारखा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी इनामदार बाई तयार झाल्या, त्याच आधी पांडोबा वाड्यावर दाखल झाला होता. बाईसाहेब दारा बाहेरच्या बैल गाडीत बसल्या, पांडोबाने त्या आधीच बैलगाडीत खाली गवताच्या गंजी,( बैलांना चारा आणि बसायला माऊ लागावे यासाठी ) त्यावर सतरंजी, मग त्यावर गादी घातली होती. त्यावर बाई साहेब बसल्या आणि गाडी निघाली. 

    गावापासून जिल्ह्याचे गाव साधारण असेल २५ ते ३० किलोमीटर , तसा प्रवास लहान पण रस्ता अगदीच खाचखळंग्याचा होता, त्यामुळे गाडी बेताबेतान पुढे जात होती. बाई बैलगाडीत बाजूच्या पट्ट्या धरून बसल्या होत्या. बैलाच्या गळ्यातील घुंगर माळा वाजत होत्या. पांडोबा बैलगाडीच्या सोबत चालत...मधेच बैलांच्या गतीन बरोबर पळत होता.

   गाडी प्रवास करून जिल्ह्यातील बाजारपेठेत आली. तशा बाईंनी गाडी थांबवायला सांगितली. बाई टुणकन उडी मारत गाडी खाली उतरल्या.

" किसन, तू गाडी त्या तिथल्या लिंबाच्या सावलीत लाव, बैल सोड आणि थांब, मी पांडोबाला सोबत घेऊन पायीच जाते बाजारपेठेत. चल रे पांडोबा" बाईंनी दोघांना आज्ञा दिल्या आणि त्या बाजारात निघाल्या.

    किसनने गाडी झाडाखाली नेली, बैलं मोकळे सोडले. गादी खालचे गवत वर केले त्यातील काही गवत बैलांना चारा म्हणून टाकले. बैलांच्या दोऱ्यांची टोकं जु ला बांधल्या आणि तो पण सावलीत निवांत बिडी ओढीत बसला. पांढरे शुभ्र बैलं देखील जरा आरामात गाडीपासून दूर जाऊन बसले. तरी किसान त्यांच्या कडे नजर ठेऊन होता. 

                                                                 

                                                                          

    बाई बाजारात काहीबाई सामान घेत घेत एका कापडं दुकानाच्या जवळ आल्या. त्यांना दुकानाच्या बाहेर पाहून आतून मालक पटकन बाहेर येत म्हणाला " या बाईसाहेब याss, नानासाहेब कसे आहेत?" दुकानदार आदराने त्यांना विचारत होता.

" ठीक आहेत, पांडोबा तू थांब इथं" बाईंनी त्याला पायरीवर बसायला सांगितले.

    पांडोबा एखाद्या लहान मुलाप्रमाणे पायरीवर बसून त्या दुकानाकडे पाहत होता. दुकानात लाकडी कपाटात विविध रंगांच्या साड्या ठेवलेल्या होत्या, त्यात काही नऊवार लुगडे, काही पाचवार साड्या , खणं, माणसांच्या साठीचे काही कापड देखील दुसऱ्या लाकडी खणात दिसतं होते.  कापडाचे लाकडी दांडीला गुंडाळून त्याचे खांब विवध रंगाप्रमाणे उभे करून ठेवलेले होते. त्याच्या वर पांढऱ्या शुभ्र धोतरांच्या एकावर एक अश्या अनेक खड्यांचा ठीग होता.  त्यात काही जाड काठाचे, काही नक्षीचे असे धोतरं ठेवलेले होते.

    दुकानात बसायला गादया त्यावर पांढऱ्या चादरी घातलेल्या होत्या. पांडोबा साठी हे सगळेच नवीन होते, त्याने  याआधी हे कधीच पाहिले नव्हते. तो दुकानातील हे सगळे पाहून अत्यंत कष्टी होत स्वतःकडे पाहत होता. आपल्या कंबरेखाली जेमतेम मळकट मंचा, वरचे अंग उघडे, तीच गत आपल्या भामाची तिच्या अंगावर पण धड काही नाही जे आहे ते अनेक ठिगळ लावलेलं....त्याच्या मनात काहीशी खिन्नता आली होती.

" हे दया सगळं आणि हिशोब करा" बाईंनी दुकानदारांना सांगितले
"हो बाई साहेब, बसा काही वेळ"

    दुकानदाराने सर्व हिशोब केला " अरे, जरा हा गठ्ठा बांधून दे रे याचा" असं म्हणून दुकानातील नोकराला त्याने आज्ञा केली. नोकराने सगळ्या सामानाचा एक भला मोठा गठ्ठा बांधून तयार केला. 

"हे घ्या पैसे, नीट सगळे दर लावलेत नं? दया तो गठ्ठा बाहेरच्या आमच्या माणसाकडं, पांडोबाss" बाईंनी आवाज दिला. 

    तसा पांडोबा उठून उभा राहिला, दुकानातील नोकराने ओझे त्याच्या डोक्यावर दिले. बाईसाहेब आणि पांडोबा दोघे पण बैलगाडीच्या दिशेला निघाले. आता पांडोबाच्या डोक्यावर तो भला मोठा गठ्ठा, दोन्ही बगलेत पिशव्या  असे घेऊन तो उन्हात, अनवाणी पायाने चालत होता. दोघंपण घाम पुसत पुसत बैलगाडीच्या दिशेला येताना किसनने पाहिले. त्याने लगेच गाडीला बैल जोडले आणि गाडी त्यांच्या दिशेला हाकली.

                                    

     आता दुपार टळून गेली होती. सर्व आणलेले सामान वाड्यात नेवून ठेवेपर्यंत चार वाजले. तो पर्यंत पांडोबाच्या पोटात फक्त पाणीच होते, तेही चालून, पळून, ओझ उचलून शरीरातून उडून गेले होते. तो सर्व सामना वाड्यात ठेऊन माघारी निघणार इतक्यात...

"पांडोबा थांब जरा" आतून बाईंनी आवाज दिला. त्याला वाटले आता अजून काय काम काढलं असलं? जरा नाराजितच तो थांबला.
" हो बाई जी"
" हे घे" असं म्हणत बाईंनी त्याच्या हातावर काही भाकऱ्या, कांदा आणि भाजी दिली, " खा बाहेर बसून मग जा हवं तर घराकडे"
" नको जी घराकडं जातू, अजून काही काम असलं तर सांगा जी" 
" नाही, अजून काही नाही, जा तू...आणि हो उद्या सकाळी ये, सोबत भामाला पण घेऊन ये."

" भामा हे घे, इनामदार बाईंनी दिल्या हायत भाकरी" तो दमून घरी पोंचला.
"खावा की मग!!! कवापासून तुम्ही उपाशी असत्याल" त्याच्या काळजीपोटी ती म्हणाली.
" पाणी दे फक्त पायला, आता दिस पार मावळतीला आला बघं. आता दिवे लागले की दोघं बी सोबतच खाऊ  "

     
                                                                                                         

    क्षितिजावर सूर्य मावळतिला आला, गाईगुरं परत घराकडं निघाले, पक्षी आपआपल्या घरट्यात निघाले, सांजप्रकाश आकाशात दिसू लागला, हळू हळू अंधार सगळीकडे आपले हात पाय पसरायला लागला. लवकरच काळोख झाला. तसे घरा घरातील दिवे पेटायला सुरुवात झाली. पांडोबा आणि भामा मात्र अजून अंधारातच घराबाहेर बसलेले होते. एकच पणती पेटेल इतकेच तेल घरात होते. त्यामुळे अगदी जेवताना लावावी आणि परत विझवावी याच हेतूने ते दोघेही अंधारात बसले होते.
 " खायायचं का?" भामाने विचारले.
"हा,खाऊ "

    दोघे पण हातावर भाकरी घेऊन जेवू लागले, जेवताना आपण दिवस भर काय काय पाहिले, कुठं कुठं गेलो हे सगळं त्याने भामाला सांगितले. ती बाजारपेठ...ती सगळी दुकानं...त्यातील सगळ्या वस्तू, तो अगदी भरभरून बोलत होता.

" बाईंनी उद्या सकाळी तुला बी वाड्यावर बोलावलं आहे"
"मला, अन ते कशा पाई?"
" मला काही म्हणल्या नाही बाsss, बघू उद्याच उद्या!!"

     जेवणं झाली तशी भामा घरात झोपली आणि पांडोबा मुक्त आकाशाच्या खाली जमिनीवर आडवा पडला. दमलेलं शरीर आडव झालं. जरा जरा वारा सुटला होता. कुठं कुत्रे भुंकत होते, देवळात भजन सुरू होते, त्या सगळ्या आवाजात तो डोळे मिटून पडला. डोळे मिटले की त्याला आधी कापडं दुकान दिसले... त्यातील सुंदर सुंदर, रंगीबिरंगी कपडे...बाईंनी विकत घेतलेले कपडे...त्याचा मोठा गठ्ठा....तो उचलणे आपल्याला नको होत आहे... आपल्या आणि भामाच्या अंगावरील कपडे... याच विचारत त्याचा डोळा लागला. दमलेल्या शरीराला दमून झोप लागली.

" भामाss,ए भामा, हे बघं माझ्याकडं बघं, अगं ये कि लवकर बाहेर" तो आनंदनात तिला घराबाहेर बोलवत होता.
" अगं बाई
ss" भामा डोळे विस्फारून पांडोबाकडे पाहतच राहिली. त्याने पांढरे शुभ्र धोतर नेसलेले होते. तेही अगदी पायघोळ. अंगात निळ्या रंगाचा पूर्ण बाहीचा सदरा घातलेला. असा तो तिला दिसला. त्याच्या हातात कागदात गुंडाळलेले अजून काही तरी होते. 
"हे काय हाय जी? सांगा की मला?"
" हे, हे तुला" पांडोबाने आपला हात पुढे करत आणि आनंदी होत तिच्या हातात ते दिलं.
" मला, काय हाय यात?"
" तूच पहाय"
" लुगडं, लुगडं, मला"ती खूप खुश होत म्हणाली.
"जा, पटकन ये नेसून" 

    दोघे पण नवीन कपड्यात एकमेकांनाकडे पाहत होते. तितक्यात...

" अहो, अहो उठा की, तांबडं फुटलं की, कोंबडं बी आरवल आणि तुम्ही अजून झोपले"
" आsss,सकाळ झाली...आणि माझ्या अंगावरली कापडं आणि तूझ्या अंगावरले लुगडं, कुठं गेलं?"
" काय याड बी
डं लागल की काय? अहो कोणती कापडं? उठा चूळ भरून घ्या"
" सपान!!! छे, आपल्याला फकस्त सपान पडलं?"तो नाराजीन आपल्या अंगातील कपड्यांकडे बघत जागेवरून उठला.
 
" आले का तुम्ही दोघं, बसा बसा तिथं" बाईंनी पांडोबा आणि भामाला पाहत स्वागत केले
"राम,राम, हा आलो जी" पांडोबा नमस्कार करत म्हणाला
"या असे समोर या" नाना दोघांना समोर बोलवत म्हणाले

    दोघं पण भितभित समोर सरकले. नाना चार पायऱ्या उतरून खाली  अंगणात  आले, पाठोपाठ बाईपण खाली आल्या.

"पांडोबा हात समोर कर" त्याला वाटले आपल्याला काय मारबिर बसतो कि काय? त्याने भितभित हात समोर केला.
" हे घे" असं म्हणतं त्याच्या हातावर नानांनी एक पांढरे शुभ्र धोतर आणि पिवळ्या रंगाच्या सदऱ्याचे कापड ठेवले.
तो हे पाहतच राहिला.
"भामा तू हे घे" असं म्हणून बाईंनी तिला पण एक लुगडं आणि काचेच्या हिरव्या बांगड्या असे तिच्या हातात दिले.

    या घटनेतून दोघं पण एकदम चकित झाले. मालकांनी आपल्याला कापडं दिली? पण कसं काय बरं?

" अरे आज आमच्या संसाराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, त्यामुळे आम्ही असे ठरवले की सगळ्या गाड्यांना आणि कामगारांना कपडे द्यायचे. तेच काल तुम्ही जिल्ह्यात जाऊन घेऊन आलात" नाना सांगत होते.

    पांडोबाच्या मनात विचार आला. काल आपल्याला जो मोठा गठ्ठा उचलायला लय जड वाटत होता. त्यात तर आपल्यासाठी पण हे कपडे होते कीss, आणि पहाट पडलेले आपले सपान बी खर झालं कीss...

"धन्यवाद मालक आणि बाईसाहेब" रडतच दोघांच्या तोंडून फक्त हेच शब्द बाहेर पडले...

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या (comment) प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या, सोबत आपले नावंं लिहावेे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

"Pandoba"

     "Bhama aang a bhama" Pandoba hurriedly came to the door of the house. Although the house looked like a hut, the two of them had erected it with their hands.

    Bhama and Pandoba started their life with four pots and in this place they both built their house by sweating. Pandoba walked in the forest and brought huge bundles of sandalwood from his head. One by one, they erected a caravan stick and erected four walls ... but both of them worked hard day and night to erect the house. He twisted the rope around his hand and tied all the vertical sticks and hit them with black clay mud. The four walls remained standing, but we walked back to the forest for the roof, collected grass and dried saga leaves, and weaved the roof from them.

"Now that the roof has been removed, our houses are ready !!! .." They both worked harder and the same thing happened. The house of their right stood.

    As such, it has now become history. He had built this house many years ago. He was repeatedly damaged by the wind and rain, and they worked hard to get him back up.

     Today, as he was approaching the house, he was pushing Bhama.

"Why call Oss Kamhun?" Bhama asked coming out of the house.

"Oh my go to Inamdarwada's castle (https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/Inamdarwada.html) and give Wise water to drink"

"This is the end" Bhama brought water from the house in a clay pot.

     Pandoba was sitting on his bare body sweating. A waist-length punch was tied at the waist. Only one such punch on the shoulder. On the left side, his body was exposed, the color was very rocky, and in the open, his whole body seemed to be warmed up. Bhama was also wearing patched clothes in ten places. It was her clothes but it was just coming up to her knees. This is how their torn world started. He drank the water brought by Bhama in his mouth and after drinking the water he went towards Takotak castle.

"Rams Rams owner" he shouted as he crossed the wooden threshold of the castle.

"Hey, why did you come, Pandoba !!! Let's just sit down .."

    But we, Harkamya, did not sit in the place given to him by this feeling, but sat in the same place, kneeling (as if sitting on the toilet).

"Owner called Bolvilat GSS?"

"Are you going to the district with us tomorrow morning? I can't go, go with me and bring some luggage, I want to buy something. Thirty" Nana was talking to Pandoba.

"Go on, tell the left I'm hi with them. What more can I say?"

"No, then come tomorrow morning."

"Yes sir"

    Pandoba was hardworking, honest and trustworthy. The next morning the rewarding lady was ready, just before Pandoba had arrived at the castle. Baisaheb Dara sat in the bullock cart outside, Pandoba had already put the haystack under the bullock cart (satranji on it (to feed the bullocks and mau), then put a mattress on it. Bai Saheb sat on it and the car started.

    The distance from the village to the village of the district would be about 25 to 30 kilometers. The journey was short but the road was very bumpy, so the train was moving aimlessly. The woman was sitting in the bullock cart holding the side straps. The bull's neck was ringing. Pandoba was walking with the bullock cart ... Madhech was running with the speed of the bullocks.

   The train traveled to the district market. The woman told him to stop. Bai Tunkan jumped out of the car.

"Kisan, you drive in the shade of that lemon, let go of the ox and wait. I will walk with Pandoba to the market. Let's go, Pandoba."

Kisan drove under the tree, releasing the oxen. Some of the grass under the mattress was used as fodder for the oxen. Xu tied the ends of the oxen's ropes and he also sat in the shade pulling a sleeping bidi. Even the white bulls moved away from the car and sat comfortably. But the farmer was watching them.

The woman came to a cloth shop in the market carrying some goods. Seeing them outside the shop, the owner quickly came out from inside and said, "How are you, Nanasaheb?" The shopkeeper was respectfully asking them.

"Okay, Pandoba, you stop here," the woman told him to sit on the steps.

    Pandoba was sitting on the steps like a child looking at the shop. In the wooden cupboards of the shop, sari of different colors were kept, in which some nine-piece clothes, some five-piece sari, miners, some clothes for men were also seen in another wooden mine. The wooden poles were wrapped in cloth and its pillars were erected in different colors. On top of it was a pile of white stones, one on top of the other. It had some thick-edged, some patterned dhoti.

There were white sheets on the mattress to sit in the shop. It was all new to Pandoba, he had never seen it before. He was looking at himself with great difficulty seeing all this in the shop. Just like the floor under her waist, the upper limbs are open, the same thing happened to her brother-in-law on her body, but the torso is nothing, it is many patches .... There was something sad in his mind.

"All this kindness and calculation," Baini told the shopkeepers

"Yes lady sir, sit down for a while"

    The shopkeeper calculated everything and said, "Hey, let's tie this bundle." The servant made a big bundle of all the things.

"Take this money, haven't you fixed all the rates? Please take that bundle to our man outside, Pandobas" the left voice shouted.

    As Pandoba stood up, the shopkeeper put the burden on his head. Both Baisaheb and Pandoba went towards the bullock cart. Now Pandoba was walking barefoot in the sun with a big bundle on his head, bags in both arms. Kisan saw the two of them coming towards the bullock cart, sweating profusely. He immediately attached the oxen to the cart and drove the cart towards them.

It was past noon. It was four o'clock when all the luggage was taken to the castle. Until then, there was only water in Pandoba's stomach, which had also flown away from his body by walking, running, carrying weights. He will leave after leaving all the matches in the castle ...

"Pandoba, wait a minute," the left voice called from inside. He wondered what else he had done. He stopped a little annoyed.

"Ho bai ji"

"Take this," said the lady, handing him some bread, onions and vegetables.

"I don't want to go home, if there is any other work, please tell me."

"No, nothing else, you go ... and yes, come tomorrow morning, bring Bhama with you."

"Take this Bhama, Hayat bread given by Inamdar Baini" He reached home in a daze.

"Eat it then !!! You will be hungry from Kawa" she said worriedly.

"Give water only to the feet, now let's see if it comes down. Now that the lights are on, let's eat together."

The sun went down on the horizon, the cows returned to their homes, the birds went to their nests, the evening light appeared in the sky, and slowly the darkness spread its arms and legs everywhere. It soon became dark. That's how the lights in the house started to turn on. Pandoba and Bhama, however, were still sitting outside in the dark. There was only one oil in the house. So they were both sitting in the dark with the intention of putting it on while eating and turning it back on.

 "Want to eat?" Bhama asked.

"Yes, let's eat."

    The two of them started eating with bread in their hands. He told Bhama everything he had seen during the day and where he had gone. That market ... all those shops ... all the things in it, he was talking at length.


"The lady has called you to the castle tomorrow morning."

"Me, Ann, how did you get it?"

"I didn't say anything, bass, let's see tomorrow !!"

     As the meal was over, Bhama slept in the house and Pandoba lay down on the ground under the open sky. The exhausted body became paralyzed. The wind was blowing a little. Where dogs were barking, hymns were being sung in the temple, he wiped his eyes at all those noises. When he rolled his eyes, he saw a cloth shop first ... the beautiful, colorful clothes in it ... the clothes bought by the left ... his big bundle .... you don't want to pick it up ... the clothes on you and your nephew .. His eyes widened as he asked. Exhausted body fell asleep.


"Bhamass, a bhama, look at me, come out soon" he was happily calling her out of the house.

"Oh my God" Bhama kept looking at Pandoba with wide eyes. He was wearing a white dhoti. Pretty even pants. Wearing a full blue sleeveless shirt. That's how she looked. He had something else wrapped in paper in his hand.

"Hi what's this? Tell me?"

"Hey, this is you" Pandoba extended his hand and happily handed it to her.

"Me, what's in it?"

"You see"

"Clothes, clothes, me," she said happily.

"Go, come quickly."

The two of them started eating with bread in their hands. He told Bhama everything he had seen during the day and where he had gone. That market ... all those shops ... all the things in it, he was talking at length.


"The lady has called you to the castle tomorrow morning."

"Me, Ann, how did you get it?"

"I didn't say anything, bass, let's see tomorrow !!"

     As the meal was over, Bhama slept in the house and Pandoba lay down on the ground under the open sky. The exhausted body became paralyzed. The wind was blowing a little. Where dogs were barking, hymns were being sung in the temple, he wiped his eyes at all those noises. When he rolled his eyes, he saw a cloth shop first ... the beautiful, colorful clothes in it ... the clothes bought by the left ... his big bundle .... you don't want to pick it up ... the clothes on you and your nephew .. His eyes widened as he asked. Exhausted body fell asleep.


"Bhamass, a bhama, look at me, come out soon" he was happily calling her out of the house.

"Oh my God" Bhama kept looking at Pandoba with wide eyes. He was wearing a white dhoti. Pretty even pants. Wearing a full blue sleeveless shirt. That's how she looked. He had something else wrapped in paper in his hand.

"Hi what's this? Tell me?"

"Hey, this is you" Pandoba extended his hand and happily handed it to her.

"Me, what's in it?"

"You see"

"Clothes, clothes, me," she said happily.

"Go, come quickly."

    The two were looking at each other in new clothes. Just ...

"Hey, hey, get up, the red burst, the rooster crows and you're still asleep."

"Assss, it's morning ... and the clothes on me and the clothes on you, where did you go?"

"What kind of clothes do you have?" "What kind of clothes? Get up and fill the stove."

"Spaan !!! Hey, did you just fall asleep?" He got up from his seat looking at his clothes.


 "Come on, you two, sit down, sit down," the lady greeted Pandoba and Bhama

"Ram, Ram, ha alo ji" Pandoba said saluting

"Come forward like this" Nana said calling both of them in front

Both of them moved towards the wall. Nana came down the four steps to the courtyard, followed by the women.

"Put Pandoba's hand in front of you." He put his hand in front of the wall.

"Take this," says Nana, placing a white dhoti and a yellow shirt on his hand.

He kept watching.

"Bhama, take this," she said, handing him a cloth and a green glass bracelet.

    The two were shocked by this incident. Did the owner give you clothes? But how?

"Oh, today is the 25th anniversary of our world, so we decided to give clothes to all the cars and workers. That's what you brought to the district yesterday," Nana was saying.

    The thought came to Pandoba's mind. The rhythm seemed heavy to pick up the big bundle you had yesterday. In it, it was for you, but it was clothes, ss, and your spawn that fell in the morning came true, ss ...

The only words that came out of both their mouths while crying "Thank you Malik and Baisaheb" ...

© Nikhil Devidas Vaze

9011096250

Wednesday, May 19, 2021

"शनिवार पेठ"

 "शनिवार पेठ" 

    मच्या हॉस्टेलचा एक नियम होता....आम्हाला फक्त दोन वर्षच हॉस्टेलमध्ये राहता येत होतं. तिसऱ्या वर्षी आपला मुक्कम  हॉस्टेल मधून हलवावे लागतं होता. त्यामुळे दोन वर्षांनी हॉस्टेलचा अध्याय संपला !!!!!  आणि दुसऱ्या रूमचा शोध सुरू झाला.

     पुण्यात एखादी खोली भाड्याने मिळणे अवघड नव्हते...पण त्यासाठी ओळख लागायची. (म्हणजे ओळख असेल तर खोली मिळणे सोपे व्हायचे). एका सिनिअर मित्राच्या ओळखीमुळे आम्हाला एक जागा मिळाली...तीही शनिवार पेठेत!!!!! जुन्या पुण्यातील पेठ भागात प्रवेश मिळणे ( भाड्याने) म्हणजे एखाद्याने एकही प्रश्न न विचारता दार उघडण्यासारखे होते. (आता काही बदल झाले असतील......अशी उगाच माझी अपेक्षा). अर्थात, घरमालकाने आम्हाला त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याशिवाय खोलीची किल्ली दिली नव्हती. 

   आमची खोली म्हणजे एका मोठ्या वाड्याचा एक छोटा हिस्सा होता, खोलीची साइज साधारणतः १४*१२  व एकाचे भाडे ४०० रूपये! हा वाडा पिढ्यानपिढ्या चालत आलेला, त्याचे बांधकाम ही खूप जुने होते. वाडा तसा दोन मजली आणि मोठा होता. खाली ६-७ खोल्या आणि वरती पण २ मोठे हॉल आणि ५-६ खोल्या. जुन्या पद्धतीचे माळवदाचे बांधकाम केलेले होते. (माळवद म्हणजे छतासाठी ऊभे,आडवे लाकडाचे मोठे मोठे ओंडके वापरून त्याच्यावर माती, शेण,आणि इतर काही वस्तू एकत्र करून घालतात).

     वाड्यातील वरील मजल्यावर असलेल्या हॉलला मध्येच खड्डा होता (जो हॉल ची फरशी खचल्यामुळे तयार झाला होता), तो रात्री लक्षात ठेऊन चुकवावा लागे. हा वाडा एखाद्या जीर्ण जख्ख म्हाताऱ्या सारखाच होता. त्यातील अनेक बिऱ्हाडं पण तसेच होते. 

    आमच्या त्या खोलीत एक मोडका कॉट (ज्याला बसून बसून मध्येच बाक ही आलेला), एक खाली जमिनीवर गादी आणि  फडताळे (भिंतीतले कपाट) एवढ्याच गोष्टी होत्या. त्या छोट्या खोली मध्ये आम्ही दोन मित्रांनी आपले हात लांबवले की दोन्ही भिंतींना हात लागत असत. ती खोली मला नेहमी वीर सावरकर यांच्या खोलीची आठवण करून देत असे.

    आमच्या या खोलीला लागून अजुन एक तशीच खोली होती. आम्ही त्या खोल्यानां जुळ्या खोल्या म्हणायचो.   त्यापैकी एका खोलीमध्ये माझा एक मित्र आणि मी रहायला आलो. पहिल्या खोलीत आम्ही राहायचो आणि पुढच्या खोलीत घरमालक कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे क्लास घ्यायचे. आमचे घरमालक डोक्याने खूप हुशार होते,  पण स्वभाव चिडका! कायम तोंडात मसाला तंबाखू, त्यामुळे बोलताना तोंडाचा वास यायचा. खर्जात पण हळू आवाज, लालसर गोरा चेहरा, घारे मोठे डोळे आणि कायम हाताची घडी घालून बोलायचे. समोर खिसे असलेली सेमी बेलबाॅटमची पँट, आकाशी वा निळा अर्ध्या बाह्यांचा इन केलेला शर्ट अशा वेशात ते कायम असतं. ते क्लास घ्यायला आमच्या खोलीतून  त्यांच्या खोलीमध्ये जायचे आणि रूम मध्ये फुल बाहीच्या बनियन वर मुला मुलींना शिकवायचे. 

    पहिल्या वेळी हे खूप विचित्र वाटले होते. आमच्या खोलीतून मुलं,मुली दुसऱ्या खोलीत क्लासला जायचे. हे म्हणजे  रेल्वेचा एक डब्बा ओलांडून दुसऱ्या डब्ब्यात जाण्यासारखेच होते. नंतर आम्ही याला सरावलो आणि क्लासच्या आधी सावरून, आवरून बसायला लागलो.  त्या दुसऱ्या खोलीत रेल्वे सारखीच खडखड चालत असे, ती खडखड रात्री वाढायची. काही दिवस सहन केल्यावर मात्र त्याचा छडा लावायचा असे ठरवले. एक दिवस रात्री आम्ही झोपलो होतो, सरांच्या खोलीतून आवाज यायला सुरूवात झाली....म्हणून आम्ही त्यांच्या खोलीचे दार उघडून अंधारातच त्या खोलीत प्रवेश केला. खोलीतील लाईटचे बटन काही केल्या  सापडतं नव्हते...एकदाचे कसे बसे सापडले...आणि लाईट सुरू करून आम्ही आवाजाच्या दिशेने पुढे सरकलो...आवाज एका जुन्या ऑईलच्या काळ्या कॅन मधून येत होता. हळूच त्याचे झाकण उघडले...तर काय?????..... त्यात पाणी.....आणि दोन कासवं !!!!

                                 

     जे आरामात पाण्यात पोहत होते, त्यांची पाठ त्या ऑईल कॅनला बडवत होती. ...म्हणून तो खडखडाट सुरू होता. एकूण एका सस्पेन्स चा पर्दाफाश करण्यात आमच्या काही रात्रीची झोप गेली होती. त्यांच्याकडे पोपट होताच, मांजरी ते रूम वर आले की यायच्याच...आणि आता हे कासवं....असे हे त्यांचे प्राणी संग्रहालय होते. नशीब आमची गणती त्यांनी प्राण्यात केली नाही.

                                                                                                                                                                        

    माझ्या कॉटच्या वर एक जुनी लाकडी ३*३ची खिडकी होती. त्या खिडकीची दारं विशिष्ट पद्धतीत मिटले की त्या खिडकी मधून मस्त गार वाऱ्याची झुळूक येत असे, ती तशी झुळूक आल्हाददायक होती कारण रूम मध्ये पंखा नव्हता. उन्हाळ्यात फार गरम व्हायचे.                                                     

    खरंतरं या वाड्यात आम्ही दोन ते अडीच वर्षे कसे राहू शकलो हे आश्चर्यच आहे. रात्री हा वाडा एकदम भयपटाचीच आठवण करून द्यायचा. त्यात बाथरूम - संडास ला जाणे हे तर दिव्य होते.....तिथे जायला १०- १२ पायऱ्या उतरून खाली जावे लागत होते. रात्री खाली जाताना कधी समोरून घुस, मोठाले उंदीर जायचे.  अंगणात एक बारीक बल्ब, तसाच एक खाली बाथरूम - संडासात बारीक बल्ब असे.

    वाड्याच्या मागील अंगणात मध्यभागी सोनचाफ्याचे झाड व त्यावर मालकांनी बांधलेल्या शिड्या नेहमी साप शिडी सारख्या वाटत असतं. ते या शिड्यांचा वापर करून सोनचाफ्याची फुले तोडून विकत होते. वाड्यात अनेकांची बिऱ्हाडं होती आणि काही आमच्या सारखी मुले देखील! किती लोक...किती विविध त्यांचे स्वभाव, किती वेगळे त्यांचे जगणे आणि व्यथा ही ... पण तरीही ही सगळी मंडळी एकत्र राहत होती.

    एक उत्तम पेटी वादक होते, त्यांनी आपल्या उभरतीच्या काळात अनेक दिग्गज गायकांना साथ केली होती. पुणे आकाशवाणी वर अनेक कार्यक्रम केले होते. पण आता उत्तर आयुष्य असह्य शारीरिक व्याधी व आर्थिक अडचणीतून जात होते. 

    त्या विरूद्ध एक काकू होत्या त्यांच्यासाठी आयुष्य मजेत जात होते. त्यांच्याकडे  रेल्वेचा फुकट पास होता त्यामुळे त्या फक्त  २- ३ महिनेच खोलीत राहायच्या बाकी फक्त प्रवास करायच्या. त्यांना मी दोन वर्षात फारच कमी वेळा वाड्यात पाहिले व बोललो आहे. त्यांना कोणतेही शहर वा राज्य विचारले की त्या म्हणायच्या "किमान २-३ वेळा जाऊन आले मी." 

हे दोन चित्र पाहून मला त्याही वेळा खूप वाईट वाटे...खरंच आयुष्य किती वेगवेगळं असतं...?

    एकजण पैसे आहेत म्हणून उपभोगत होत्या आणि दुसरा नाही म्हणून अन्नान्नदशेत! खूप भयानक परिस्थिती होती..... त्या उत्तम कलाकाराला उत्तर आयुष्य कसे जगावे या प्रश्न होता, तर काकूंना आयुष्यात काहीच उरले नाही म्हणून मज्जा करण्यात समाधान वाटायचे.

    या वाड्यात मला एक गोष्ट नक्की उमजली ती म्हणजे आपल्या गरजा कमी असाव्यात. आपण सगळीकडे प्राप्त परिस्थितीत स्वतःला सावरून घेतले की जगणे सोपे आणि आशावादी होते.

                        Shaniwar peth police chouwki

    "कुठपर्यंत आलात तुम्ही? अच्छा अच्छा, पोलिस चौकी पर्यंत! बरं बरं......आता आधी डावीकडे वळा....मग उजवीकडे......मग आधी मोठा रस्ता.....मग....लहान गल्ली.....मग त्या गल्लीत उजव्या  हाताला जमिनीवर नळाचे १०-१२ पाईप दिसले, की त्याला सोबत करत तसेच पुढे पुढे या.....मग एक बोळ लागेल.....आणि जिथे नळाचे पाईप आणि बोळ संपेल तेथेच डाव्या हाताला निळ्या रंगाची भिंत असणारा वाडा.... तिथेच आम्ही राहतो....!"

    असा रूमचा पत्ता मी अनेक जणांना सांगत होतो. कारण सुरवातीला आम्हाला घर नंबर माहीत नव्हता.जसा जसा वाड्याचा आणि तेथील माणसांचा परिचय झाला तेव्हा बऱ्याच गोष्टी समजल्या.

    सुरुवातीला ही खोली आम्ही फक्त गरज म्हणून घेतली होती. आपण पुढे मागे ही जागा सोडून दुसरीकडे जाऊ असा विचार केला होता. पण तसे करणे शक्य झाले नाही...आणि येथेच रहायला लागलो!!! थोड्या दिवसांनी नित्यक्रम मार्गी लागले... कॉलेज...मेस...क्लास....शाखा... आणि झोपायला खोलीवर!एकदा रूटीन बसलं की आपण पटकन सेट होतो.

    आम्ही खोली भाडे तत्वावर घेताना  आमचा असा समज होता की आम्ही आख्खी खोली भाड्याने घेतली आहे. त्यामुळे त्यात दोन काय आणि  चार काय? सगळ्यांना खोलीत सामावून घेऊ शकतो. याच विचाराने माझे आणखीन दोन मित्र आमच्या रूम वर काही दिवसांसाठी रहायला आले. 

    मालक स्वतः त्या वाड्यात राहत नव्हते. तसेही ते फक्त सकाळी व संध्याकाळी वाड्यात फेरी मारायचे (त्यांचा क्लास आमच्या खोलीच्या बाजूलाच असायचा) ; इतर वेळी व रात्री कधीही ते वाड्यात येत नव्हते. त्यांच्या या सवयीचा आम्ही बरेच दिवस फायदा घेतला. 

    पण एक दिवस अचानक रात्री ते वाड्यात फेर फटका मारायला आले. तेव्हा आमच्या त्या छोट्या रूम मध्ये आम्ही ७ ते ८ जणं गप्पा मारत बसलो होतो. आम्ही त्यावेळी सगळे जण वाड्यातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहायचो. पण त्यांच्या समोर इतके सगळे एकत्र आल्यामुळे ते जरा सावध होऊन आम्हाला विचारत होते....."तू कोण?...तू कोण....?" त्यांना बऱ्याच जणांचे चेहरे माहित नसल्यामुळे आमचे २ पाहुणे मित्र बरोबर त्यात लपून गेले आणि त्यांना काहीच समजले नाही. याचे अजून एक  कारण म्हणजे आम्ही कधीच एकत्र जाऊन त्यांना भाडे देत नव्हतो. प्रत्येक वेळी एकच जण जाऊन पैसे देऊन येत होता, त्यामुळे सगळ्यांचे चेहरे त्यांच्या लक्षात नव्हते. 

    पण त्या दिवसानंतर त्यांना काहीतरी शंका आली हे नक्की!!! वाड्यातील काही छुपे माहितगार त्यांना आमच्याविषयी माहिती पुरवत असावेत हे निःसंशय! अन्यथा कोणता माणूस इतका मोठा वाडा असाच लक्ष न देता भाड्याने देईल? मालक जरी चाणाक्ष होते,बारीक लक्ष ठेऊन होते. तरी आम्ही काही त्यांच्या हाती लागत नव्हतो. आम्ही शेंड्या लावण्यात तरबेज झालो होतो.

    माझा रोज सकाळी क्लास असे, त्यामुळे मी पहाटेच रूम मधून बाहेर पडत होतो. त्यावेळी आम्ही ३ जणं रूम मध्ये राहायचो.....एका कॉट वर मी आणि खाली जमिनीवर दोन जणं! मी उठलो की खालचा एकजण कॉटवर येऊन तोंडावर पांघरूण घेऊन झोपत होता. हा असा गनिमी कावा अनेक दिवस सुरू होता.

                                     

    मालक नेहमी प्रमाणे सकाळी क्लास घ्यायला यायचे. तेव्हा कॉटवर मित्र झोपेच सोंग घेऊन पडत असे, ते वाड्यातून गेले की हा उठायचा.......असा नित्य कर्म सुरू होता. न राहवून शेवटी एक दिवस मालकांनी हळूच पांघरूण वर करून पाहिलेच.....पण नशीब त्यावेळी तो मित्र पोटावर झोपला होता, त्यामुळे त्याचा चेहरा त्यांना दिसला नाही.

    काॅट बेसिस वर पैसे देणारे चौघे....आणि त्याबदल्यात राहणारे सहा व सात जण असा गोतावळा असायचा. आमचे पाहुणे मित्र असे काही वाड्यात राहायचे जणू काही तेच अधिकृत भाडेकरू आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबत कधीच कोणाला शंका आली नाही आणि जागेसाठीची ही बनवा बनवी त्यावेळी यशस्वी झाली. 

    आमचे अनेक मित्र ' अशी ही बनवा बनवी ' करत आमच्या खोलीवर राहिले आहेत....! आणि तुम्हाला तर माहीतच आहे ....युद्धात आणि मैत्रीत......सारे काही क्षम्य असते!!!! 

    शनिवार पेठ ही खूप जुनी जाणती पेठ आहे. आमच्या वाड्यात जशा अनेक घटना घडल्या तशाच या पेठेत पण घडल्या आहेत. आमच्या रूम जवळ असलेला शनिवार वाडा, बाल गंधर्व, त्याला लागून असलेला पूल, ओंकारेश्वर मंदिर, कसबा गणपती या ठिकाणी आम्ही नित्य हिंडायचो. किती तरी रात्री आम्ही या बालगंधर्व आणि शनिवार वाडा येथील पुलांवर गप्पा मारत बसलो आहोत. दोन्ही पुलावर रात्री हात गाडीवर बदामशेक मिळते, खूप छान चव आहे त्याची, कधी शक्य झाले तर नक्की पिऊन पहा. या पेठेला खूप ऐतिहासिक महत्व आहेच आणि जुन्या पुण्यात या पेठेचा समावेश आधी होतो. 

     माझी पुण्यातील पहिल्या चित्रपट गृहाची ओळख म्हणजे डेक्कन टॉकीज ( आताचा R डेक्कन मॉल) आणि दुसरे टॉकीज म्हणजे प्रभात टॉकीज. शाखेतील मुलांना ' बाल शिवाजी ' हा उत्तम सिनेमा दाखवायला पहिल्यांदा मी प्रभात टॉकीज येथे घेऊन गेलो.  पण शनिवारात (हा टिपिकल गावातील लोकांचा बोली शब्द आहे) राहायला आलो आणि प्रभातच्या वाऱ्या च सुरु झाल्या. पुढे पुढे तर दर शनिवारी रात्री प्रभात आणि रविवारी सकाळी मंगला टॉकीज मध्ये मॉर्निंग शो असा प्रकार ही सुरू होता. तेव्हा तिकीटाचे दर फार कमी होते, त्यामुळे इथे पिक्चर पाहणे शक्य व्हायचे.

    एकदा असेच रात्री आम्ही  प्रभातला (हा पण टिपिकल गावातील लोकांचा बोली शब्द आहे) दादा कोंडके चा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्यावेळी दादा कोंडके चे सगळे म्हणजे लागतील तितके सिनेमे आम्ही पाहिले असतील. तिकीट काढून आत जाऊन बसलो, तशी आत गर्दी कमीच होती. सिनेमा सुरू झाला...दादा कोंडके चे द्विभाषिक, राजकीय,सामाजिक कोट्या करणारे विनोद...लावण्या असे सगळे त्या सिनेमात होते...हे सिनेमे पाहताना डोक्याला कोणताच ताण येत नव्हता. मारामारी असली तरी ती विनोदी असते....निवांत मजा घेत सिनेमा पाहत होतो....एका लावणीला आमच्या पुढील ३-४ रांगेतील काही बायका/मुली  जागी उभ्या राहून नाचत होत्या...!!! 
    आमच्या एका मित्राला हे समोरील पडद्यावरील लावणीचे दृश्य आणि समोरील अंधारात पाठमोऱ्या नाचणाऱ्या मुली हे दोन्ही पाहून अचानक चेव सुटला. त्याच्या नकळत अंगठा आणि तर्जनी चा उत्तम उपयोग करून त्याने खणखाणीत शिट्टी वाजवली ( त्यावेळीं आमच्यात तोच अशी शिट्टी बजावण्यात एकदम तरबेज होता). लावणी नंतर मध्यंतर झाली, लाईट लागले आणि त्त्या बायकांनी मागे वळून पाहिले,आपल्याला कोणी शिट्टी वाजवली ते......!त्यांना पाहताच आम्हाला समजले की माझ्या मित्राने चुकीचा नंबर फिरवला आहे....! कारण ते सर्व  तृतीयपंथीय होते.......!आणि सिनेमाच्या तिकिटात डान्सची तालीम करायला आले होते.....!!!! आमची त्या रात्रभर हसून हसून पुरेवाट झाली... खूप दिवस या विषयावर आमची चिडवा चिडवी सुरू होती. खरंतर ही फक्त गमंत झाली पण असे अनेक विनोदी,दुःखाचे प्रसंग या शनिवार पेठेत घडले आहेत.

    आता आम्ही सगळे जण एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतोच. वाड्यातील इतरांसाबोत पण चांगले सुत जुळले होते. त्यामुळे वाड्यात रात्री निवांत वेळ जात होता. मला तिथे रहायला आल्या पासून कधीही हॉस्टेलची आठवण येत नव्हती, कारण हॉस्टेल सारखेच वातावरण आता येथे पण झाले होते, फक्त यात स्वातंत्र्य अधिक मिळत होते.

    त्यावर्षीची धुळवड ही आमच्या कायम लक्षात राहील. आमच्या वाड्यातील इतर मित्र पौरोहित्य करत होते, त्यांनी पंचांग पाहून ,उद्या धुळवड आहे असे कळवले, मग काय सकाळी सकाळी लवकर उठलो आणि वाड्यात जोरदार धुळवड साजरी करणे सुरू झाली. पुण्यात अजून पण  रंगपंचमीला खेळण्याचे प्रमाण जास्त आहे. पण बाहेर गावावरून आलेल्या  मुलांना धुळवडचीच सवय आहे. आम्ही परभणीत धुळवडच खेळायचो. त्यामुळे सकाळी वाड्यात मनसोक्त रंग खेळून, दंगा मस्ती करून आम्ही "चला किमान चहा तरी पिऊन येऊ" म्हणून जवळच असलेल्या अमृततुल्य वर रंगवलेले तोंड,पाणी खेळून भिजलेले कपडे अशा प्रकारे रस्त्यावरून १२-१५ जणं जात होतो, रस्त्यावरील सगळे लोक आमच्या कडे कुतूहलाने पाहत होते,रस्त्यावरून कोणीच रंगलेले दिसत नव्हते. मनात शंका यायला लागली की खरंच आज धुळवड आहे ना? का फक्त आपणच तोंड रंगवून फिरतोय? नाहीतर आपलेच हसे व्हायचे ? पण नशीब चहा पिता पिता एक दोन आमच्याच सारखे दिसले आणि जीव भांड्यात पडला.

    असे अनेक किस्से खोलीच्या बाहेर घडायचे.  काही बरे.... काही वाईट..... कधी कोणाला खूप खेचायचं, त्रासही द्यायचा, वाद विवाद करायचे, कोणाला चिडवायचे, कोणाला गरज पडली की आर्थिक मदत करायची, मदतीसाठी धावून जायचे, असे छान नाते आमच्या सगळ्यात निर्माण झाले होते आणि अजून पण आहेच. एक गोष्ट आम्ही नेहमीच टाळली ती म्हणजे.......कोणाचीही जीवघेणी चेष्टा कधीही केली नाही!!! आम्ही  फार साधे, निर्मळ मित्र होतो, त्यावेळी कोणाला काही चिडवले, रागावले, चुकुन चुकीचे बोललो....तरी कोणालाच राग येत नव्हता. आपल्या प्रत्येकात सुप्त स्वाभिमान, अहंकार असतोच पण तो कोणा मध्येच जागा झालेला नव्हता. कदाचित त्या वास्तूतील लोकांकडे, त्या जागेकडे पाहून तो जागाच होत नव्हता. फक्त प्राप्त परिस्थितीत जगणे आणि सगळ्यांना सामावून घेणे हेच ती जागा शिकवत असेल.

    शनिवार वाडा, बालगंधर्व रंगमंदिरात, पूल, शनिवार वाडा, अण्णा चे पोहे,( हे नक्की ट्राय करा),कसबा गणपती अशा अनेक ठिकाणी नित्य फिरणं, जाणं व्हायचे. उन्हाळ्यात खोलीत पंखा नसल्यामुळे खूप गरम व्हायचे मग काय करायचं सरळ बालगंधर्वचा पूल गाठायचा........! त्यावरील फुटपाथवर निवांत मांडी घालून वाऱ्यात गप्पा मारत बसायचो. कधी कधी तर मी एकटाच जायचो. रात्री १ - २ वाजे पर्यंत बसायचो. जरा वातावरण शांत झाले, सगळीकडे निजानिज झाली की शांत वाटायचं. एकदा असाच एकटा पुलावर वारं खात बसलो होतो. 
तितक्यात एक पोलिसांची गाडी आली......माझी विचारणा केली.....मी प्रामाणिकपणे सांगितलं की " रूम वर राहतो, खूप गरम होत होते म्हणून जरा हवेत फिरतोय" त्यावर ते काहीच न बोलता निघून गेले. आपण प्रामाणिक आणि न घाबरता बोल बच्चन दिले की काही त्रास होत नाही. हा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे... म्हणतात ना......' कर नाही त्याला डर कशाला '.

    आज पण शनिवार पेठत गेलो की ते सगळे बरे वाईट दिवस पुन्हा घडताना दिसतात. पुण्यात गेलो आणि गावात गेलो नाही तर..... पुण्यात गेलो असे वाटतच नाही. पुणे गावठाण म्हणजे कसबा, शनिवार,नारायण, सदाशिव,या पेठा मोडतात, डेक्कनने तर मला आपल्यात सामावून घेतले होतेच,पण आता जुन्या पुण्याने देखील सामावून घेतले.याच जीवावर पुण्यात इतकी वर्षे राहू शकलो.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०


वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले